spot_img
spot_img
spot_img
21.3 C
Belagavi
Sunday, October 1, 2023
spot_img
spot_img

कासारी नदीत बैलगाडी वाहून गेल्याने दोन बैलांचा मृत्यू

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथील ठाणे-आळवे बंधाऱ्याजवळील कासारी नदीत बैलगाडी वाहून गेल्याने दोन बैलांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज, सोमवारी दि.२४ दुपारच्या सुमारास घडली.

बैलांना पाणी पाजून गाडीला जुपली असताना रस्त्यावरून येणाऱ्या वाहनामुळे बैलं उधाळली. यात गाडीसह बैलं नदीत बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे अंदाजे सव्वा लाखाचे नुकसान झाले.

महाडिकवाडी ता. पन्हाळा येथील शेतकरी महादेव नर्सिंग महाडीक शेतात काम करून बैलांना पाणी पाजण्यासाठी ठाणे -आळवे बंधाऱ्यावर घेऊन आले होते. बैलांना पाणी पाजून बैलगाडी त्यांनी रस्त्याच्याकडे उभी केली अन् हातपाय धुवायला नदीत उतरले होते.

दरम्यान, रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना बैलजोडी बुजल्याने उधळलेली बैलं छकड्यासह नदीच्या पाण्यात गेलीत. कुणालाही समजायच्या आत बैलं पुराच्या पाण्यात तीस फुट वाहत गेल्याने बुडून मृत्यू झाला..या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related News

संपूर्ण समाज सरकारच्या पाठीशी आहे – लक्ष्मी हेब्बाळकर

बेंगळुरू : काँग्रेस पक्षाला सर्व समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. केवळ एका समाजाच्या पाठिंब्याने सत्ता प्राप्त होत नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर...

तुमच्या मालमत्तेच्या मूल्यांचे अवमूल्यन करू नका, वास्तविक मूल्यासाठी व्यापार करा

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारच्या स्थावर मालमत्ता मार्गदर्शक तत्त्वातील किंमत सुधारणा 1 ऑक्टोबर ते शेकडा 10% वरून 30% पर्यंत वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img