spot_img
23 C
Belagavi
Saturday, May 27, 2023
spot_img
spot_img

शिवसेना केस : शिंदे-फडणवीस सरकार राहणार : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा मात्र अद्याप निकाली राहिला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत.

त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय देताना उद्धव ठाकरेंना दिलासा देण्यास नकार दिला. कोर्टानं म्हटलं की, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला समोरे गेले नाहीत. सुप्रीम कोर्टानं पुढे म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला म्हणून ही स्थिती पूर्ववत करता येणार नाही. त्यामुळं सर्वात मोठा पक्ष भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ देणे योग्य आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडं सोपवला आहे. त्यामुळं आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच याबाबत निर्णय घेणार आहेत. पण हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा असंही सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Related News

अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान

बेळगाव : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकहाती विजय झाला असून सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.सिद्धरमय्या यांच्या...

स्टार एअरने बेळगाव ते जयपूर असा नवीन उड्डाण मार्ग सुरू केला

स्टार एअरने बेळगाव ते जयपूर असा नवीन उड्डाण मार्ग सुरू केलाबेळगाव : स्टार एअरने बेळगाव ते जयपूर असा नवीन उड्डाण मार्ग सुरू केला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img