spot_img
spot_img
spot_img
21.3 C
Belagavi
Sunday, October 1, 2023
spot_img
spot_img

राज्यात पावसाचा हाहाकार, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान; कुठं काय पूरपरिस्थिती?

मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. अजूनही काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आंबोली घाटामध्ये रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दरड कोसळली आहे. मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर ही दरड कोसळली. घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी हाताने दरड हटवतानाचे चित्र आहे. जेसीबी किंवा कोणतीही यंत्रणेचा दरड हटवण्यासाठी वापर केला गेला नाही. कोसळलेली दरड 11 ते 12 तास होऊन गेले तरी अद्याप बाजूला करण्यात आलेली नाही.

मानोरा परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे येथून वाहणाऱ्या खोराडी नदीला मोठा पूर आला. नदीच्या काठावर असलेल्या तालुक्यात बेलोरा येथे नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले. लाखो रुपयांचे सामान, वस्तू पुरात गेले. तसेच नदीच्या काठावर असलेल्या शेतकरी मुंगसीराम उपाध्ये आणि सचिन उपाध्ये यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले. पिके वाहून गेली. लाखो रुपयांचे पिकं जमीनदोस्त झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली.

Related News

संपूर्ण समाज सरकारच्या पाठीशी आहे – लक्ष्मी हेब्बाळकर

बेंगळुरू : काँग्रेस पक्षाला सर्व समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. केवळ एका समाजाच्या पाठिंब्याने सत्ता प्राप्त होत नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर...

तुमच्या मालमत्तेच्या मूल्यांचे अवमूल्यन करू नका, वास्तविक मूल्यासाठी व्यापार करा

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारच्या स्थावर मालमत्ता मार्गदर्शक तत्त्वातील किंमत सुधारणा 1 ऑक्टोबर ते शेकडा 10% वरून 30% पर्यंत वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img